या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सिंचन सुविधा सुधारणा करणे आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणे आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला 2025 मध्ये महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या 5 प्रमुख सरकारी योजनांची सविस्तर माहिती देणार आहोत.
1) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN)
उद्दिष्ट: शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य
स्वतःच्या नावावर शेती असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 (प्रत्येकी 2,000 चे तीन हप्ते) थेट बँक खात्यात जमा.2025 मध्ये या योजनेत डिजिटल नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.
लाभ : बियाणे, खत, सिंचनासाठी भांडवली मदत
अर्ज प्रक्रिया: pmkisan.gov.in किंवा स्थानिक कृषी कार्यालयात नोंदणी
2) प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY)
उद्दिष्ट: प्रत्येक शेताला पाणी देणे
ड्रिप आणि स्प्रिंकलरद्वारे सिंचनासाठी लघु व अल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% व इतरांना 45% अनुदान.
2025 मध्ये या योजनेअंतर्गत 400 कोटींची तरतूद – 3.65 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
अर्ज प्रक्रिया: mahadbt.maharashtra.gov.in
3)सुधारित पीक विमा योजना
उद्दिष्ट: नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण
नवीन दर: खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, नगदी पिकांसाठी 5%
नुकसान भरपाई ‘ई-पंचनामा’ प्रणालीद्वारे जलद आणि पारदर्शक पद्धतीने 2022-23 मध्ये 17,500 कोटींची विमा मदत वितरित
अर्ज प्रक्रिया: स्थानिक कृषी कार्यालय किंवा मान्यताप्राप्त विमा कंपन्यांमार्फत करावी
4) उन्नत शेती – समृद्ध शेतकरी मोहीम
उद्दिष्ट: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
खरीप व रब्बी हंगामात डिजिटल तंत्रज्ञान, AI आधारित मार्गदर्शन
SATHI पोर्टलद्वारे गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे वितरण
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन केंद्र
अर्ज प्रक्रिया: स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क
5) नवीन शेती पायाभूत सुविधा योजना
उद्दिष्ट: शेती व्यवसायासाठी भांडवली सुविधा
गोदामे, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट्ससाठी 2025 पासून पुढील 5 वर्षांत दरवर्षी 5,000 कोटींची तरतूद (एकूण 25,000 कोटी) तसेच शेतमालाची योग्य साठवणूक व विक्री व्यवस्थापन
अर्ज प्रक्रिया: mahadbt.maharashtra.gov.in
दरम्यान, 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या या योजनांमुळे कृषी क्षेत्रात मोठी सकारात्मक घडामोड दिसून येत आहे.आर्थिक सहाय्य, तांत्रिक प्रशिक्षण, विमा संरक्षण आणि सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची दिशा स्पष्ट दिसत आहे. या योजना वेळेत आणि योग्यरीत्या वापरल्यास महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
Mumbai,Maharashtra
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2025 मध्ये राबवण्यात येणाऱ्या टॉप 5 योजना! वाचा सविस्तर