राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या 100 दिवसांत कृषी क्षेत्रात राबवलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आणि उपक्रमांचा आढावा घेत “माझा प्रत्येक निर्णय हा बळीराजाच्या भल्यासाठी होता,” असे ठामपणे सांगितले.
महत्त्वपूर्ण निर्णय आणि यशस्वी अंमलबजावणी
स्वसंकल्पनेतून संवाद दौरे: राज्यभरात विभागीय परिसंवादाचे आयोजन करून शेतकऱ्यांना थेट कृषी मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली.
राज्यातील पहिली कृषी कर्मचारी कार्यशाळा यशस्वी: कृषी विभागातील अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा पहिल्यांदाच घेण्यात आली.
लसूण संशोधन केंद्राला भेट: कोकाटे हे या केंद्राला भेट देणारे राज्यातील केवळ दुसरे कृषी मंत्री ठरले.
देवळा तालुक्यात नुकसानभरपाई: चुकीच्या तणनाशकामुळे नुकसान झालेल्या ८४ शेतकऱ्यांना केवळ काही दिवसांतच ₹६२ लाखांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली.
बी-बियाणे व खत कंपन्यांसोबत संवाद: गुणवत्तेची खात्री व संभाव्य अडचणींवर उत्पादक कंपन्यांसोबत सविस्तर चर्चा.
पारदर्शकता आणि डिजिटल सुधारणा
‘पारदर्शक बदल्या’ योजनेचा प्रारंभ: कृषी खात्यातील बदली प्रक्रिया पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून पारदर्शकता आणली; मंत्र्यांचा हस्तक्षेप शून्य.
One Window Platform Initiative: सर्व कृषी योजना, अर्ज, ट्रॅकिंग व तक्रार निवारण एका अॅप व पोर्टलवर एकत्रित करण्याचे काम सुरू.
Farmer ID उपक्रम: 92 लाख शेतकरी आयडी तयार. शेतकऱ्यांचा डेटा अधिक मजबूत व अचूक, सर्व योजनांचा लाभ एका ओळखीद्वारे शक्य.
पीक विम्यात पारदर्शकता: सुमारे 4 लाख बोगस विमा प्रकरणे बाद, दावे ट्रॅक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा.
स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ऑनलाईन: शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयीन फेऱ्यांशिवाय लाभ मिळवण्याची सुविधा.
नवीन विस्तार आणि धोरणात्मक निर्णय
POCRA योजनेचा विस्तार: सध्या 6 जिल्ह्यांपुरती मर्यादित योजना इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतही राबवण्याचा निर्णय.
कांदा निर्यातीवर शून्य शुल्क: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून निर्यात शुल्क हटवण्याचे पाऊल.
आत्मा कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचा निर्णय: अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी पूर्ण करत मानधन वाढीचा निर्णय घेतला.
Mumbai,Maharashtra
महायुतीचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड! कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले? वाचा सविस्तर