दर कमी, खर्च अधिक, बागायतदारांचा संताप
दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत मुंबईतील वाशी बाजारात आंबा पेटीचा दर अडीच ते तीन हजार रुपये मिळत असे. मात्र, यावर्षी दर एप्रिलच्या शेवटीच कोसळले असून, बागायतदारांचे उत्पादन खर्चही निघत नाहीत. मजूर, औषधे, वाहतूक आणि अन्य खर्च बुडणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाची जाणीव व्यक्त केली आहे.
उष्णता आणि पावसाने नुकसान
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आंबे झाडावरच पिकून गळून पडत आहेत. त्यामुळे आंब्याचे प्रमाण तर वाढले पण गुणवत्ता आणि टिकाव कमी झाला आहे.
सध्याचे आंब्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत
आंबा प्रकार घाऊक कमीत कमी दर (रु.मध्ये) जास्तीत जास्त दर (रु.मध्ये)
हापूस (डझन) 300 ते 800 500 ते 1,300
बदामी (किलो) 40 ते 65 80 ते 125
लालबाग (किलो) 40 ते 50 80 ते 100
तोतापुरी (किलो) 30 ते 40 60 ते 70
केसर (किलो) 60 ते 100 100 ते 120
व्यापाऱ्यांचे अॅडव्हान्सही संकटात
काही बागायतदारांनी आधीच व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले असल्यामुळे, कमी दर असूनही त्यांना मुंबईत आंब्याचा माल पाठवणे भाग पडत आहे. यामुळे प्रत्येक पेटी मागे हजार ते बाराशे रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती मिळते.
स्थानिक बाजारात दर स्थिर, पण मागणी कमी
मुंबईतील दर घसरले असले तरी स्थानिक बाजारात आंब्याचे दर 500 ते 700 रुपये डझन दरम्यान आहेत. मात्र, ग्राहकसंख्या कमी असल्यामुळे विक्रीवर मर्यादा येत आहे. “सध्याचे दर परवडणारे नाहीत. उत्पादन खर्च आणि विक्रीदर यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे कर्ज परतफेड, कामगारांचे वेतन आणि इतर खर्च भागवणे अशक्य होईल. सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून आर्थिक मदत द्यावी.” असं मत आंबा बागायतदारांनी व्यक्त केले आहे.
Mumbai,Maharashtra
April 30, 2025 10:56 AM IST
अक्षय्य तृतीयानिमित्त आंबा खरेदी करताय का? कोणत्या आंब्याला कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर