Last Updated:
Agriculture News: शेतीतील सतत बदलणारी हवामान परिस्थिती, वाढत्या आर्थिक अडचणी आणि रासायनिक कीटकनाशकांचा होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. अनेक शेतकरी तणावाखाली जीवन जगत असून, काहीजण अशा परिस्थितीत टोकाचे निर्णय घेत आहेत.
मुंबई: शेतीतील सतत बदलणारी हवामान परिस्थिती, वाढत्या आर्थिक अडचणी आणि रासायनिक कीटकनाशकांचा होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. अनेक शेतकरी तणावाखाली जीवन जगत असून, काहीजण अशा परिस्थितीत टोकाचे निर्णय घेत आहेत.
ही समस्या लक्षात घेऊन डॉ. लक्ष्मीकांत पायमल्ले यांनी या विषयावर सखोल संशोधन केले आहे. “रासायनिक कीटकनाशकांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि ‘अपराजिता’ वनस्पतीच्या गुणधर्मांचे विश्लेषण” या संशोधन प्रबंधाद्वारे त्यांनी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे.
रासायनिक कीटकनाशकांमुळे वाढता तणाव आणि नैराश्य
संशोधनानुसार, विशिष्ट प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे मेंदूवर दुष्परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो. दीर्घकाळ कीटकनाशकांच्या संपर्कात राहिल्यास नैराश्याची लक्षणे दिसून येतात आणि काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
‘अपराजिता’ वनस्पती-नैसर्गिक उपाय
‘अपराजिता’ ही औषधी वनस्पती नैराश्य दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. प्रा. पायमल्ले यांच्या संशोधनानुसार, या वनस्पतीच्या नियमित सेवनाने मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळते.प्रयोगात असे आढळले की, ‘अपराजिता’ सेवन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तणावाचे प्रमाण कमी झाले. या वनस्पतीतील घटक मेंदूवरील दुष्परिणाम कमी करून तणाव व्यवस्थापनास मदत करतात.
शेतकऱ्यांसाठी नवीन आशेचा किरण
हे संशोधन शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास मानसिक तणावावर नियंत्रण मिळवता येईल, असा निष्कर्ष प्रा.पायमल्ले यांनी मांडला आहे.
शासन आणि कृषी संस्थांनी या संशोधनाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी नैराश्य निवारण कार्यक्रम सुरू करावेत,अशी शिफारस करण्यात आली आहे.‘अपराजिता’च्या गुणधर्मांचा प्रचार आणि प्रसार केल्यास,शेतकऱ्यांना एक नवीन दिशा मिळू शकते.
Mumbai,Maharashtra
April 22, 2025 8:01 AM IST
Agriculture News : चिंता, रासायनिक औषधे की दुसरं काही…,शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य वाढण्यामागचे कारण काय? वाचा सविस्तर