Last Updated:
Agriculture News : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नव्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणीची संधी दिल्यामुळे अधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी केवायसी (KYC) व नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत आहे. त्यामुळेच पुढील हप्त्याच्या वितरणात थोडा विलंब होण्याची शक्यता आहे, असं प्रशासनाकडून सूचित करण्यात आलं आहे.
31 मेपूर्वी नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य
ज्या शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत अॅग्रीस्टॅक पोर्टलवर यशस्वी नोंदणी केली आहे व केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना 20 वा हप्ता मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सरकारकडून या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, लवकरच यावर अंतिम छाननी होणार आहे.
त्याचवेळी, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम संधी समजून संबंधित शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा 20 वा हप्ता मिळण्यापासून ते वंचित राहू शकतात.
सध्याची स्थिती पाहता, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 15 जून 2025 नंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत पोर्टल (https://pmkisan.gov.in) वरच माहिती पडताळावी. शेतकऱ्यांनी आता विलंब न करता त्वरित नोंदणी आणि KYC पूर्ण करावी. सरकारचा हेतू अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा असला तरी त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांनीच करावी लागेल. मगच या हप्त्याचा लाभ निश्चित मिळू शकेल.
Mumbai,Maharashtra
June 11, 2025 10:37 AM IST