कपाशी लागवडीचा आढावा
राज्यात दरवर्षी अंदाजे 40 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. त्यातील वाशिम जिल्ह्यातच 29 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र कपाशीखाली असते. मात्र,2017 साली राज्यभरात गुलाबी बोंडअळीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतरही ही कीड अधूनमधून दिसत असल्याने यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
गुलाबी बोंडअळी का वाढते?
शेतात फरदड नष्ट न करणे.
वर्षभर पूर्वहंगामी कपाशीची लागवड सुरू राहणे.
त्यामुळे कीटकांना खाद्य आणि अधिवास कायम मिळतो.
परिणामी बोंडअळीचा जीव चक्र अखंड चालू राहतो.
बीटी बियाणे वितरणाचे नियोजन
टप्पा कालावधी वितरणासाठी जबाबदार
1 मे – 10 मे उत्पादक कंपनी ते वितरक
10 मेपासून वितरक ते किरकोळ विक्रेते
15 मेपासून किरकोळ विक्रेते ते शेतकरी
प्रत्यक्ष लागवड 1 जूननंतरच शिफारसीय
प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचे उपाय
गतवर्षीच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करा. मे महिन्यात कपाशी पेरणी करू नका.लागवड करण्याआधी किमान 80 ते 100 मिमी पाऊस झालेला असावा.
दरम्यान, या हंगामात उत्पन्नाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारी वेळापत्रकानुसारच पेरणी करावी, आणि कोणत्याही प्रकारची घाई किंवा पूर्वहंगामी लागवड टाळावी. असा सल्ला देण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra