Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकरी हे शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय करतात. जे शेतकरी सध्याला दुग्ध व्यवसाय करतात ते शेतकरी संकटात आलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकरी हे शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय करतात. जे शेतकरी सध्याला दुग्ध व्यवसाय करतात ते शेतकरी संकटात आलेले आहेत. एका गाईपासून आम्हाला जे दूध मिळतं त्या दुधापासून मिळालेल्या उत्पन्नामधून त्या गाईचा खर्च देखील निघत नाहीये, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
सध्याला दूध हे 25 ते 30 रुपये लिटर आहे आणि एका गाईला दिवसाला कमीत कमी 100 रुपये एवढा खर्च हा लागतो. यामुळे एका गाईचा खर्च देखील त्यांच्या दुधावर निघत नाहीये. सध्याला सर्वच गोष्टी या महाग झालेल्या आहेत. यामध्ये जनावरांसाठी लागणारे ढेप, चारा या सर्व गोष्टींचा भाव हे खूप महाग झालेले आहेत. तसेच जर एखादे जनावर आजारी पडलं तर डॉक्टरचा खर्च देखील हा लागतो, असं शेतकरी सांगतात.
सध्याला सर्वच गोष्टींचे भाव हे वाढलेले आहेत. साधी पाण्याची बॉटल देखील 20 रुपयाला येते पण आमच्या दुधाला हा भाव नाहीये. जो भाव आहे त्या भावामध्ये आमचा एका जनावराचा देखील खर्च निघत नाहीये. तर खर्च कसा काढायचा? त्यामुळे आमच्या दुधाला भाव मिळावा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी विश्वंभर हाके करतात.
गेल्या तीन महिन्यापासून दुधासाठी मिळणार अनुदान देखील मिळालेलं नाहीये आणि त्यातल्या त्यात दुधाला भाव देखील नाहीये. तर अशावेळी आम्ही कसं करायचं? घरातील खर्च देखील निघत नाही. त्यामुळे दुधाला भाव द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी जगदीश करतात.
Aurangabad,Maharashtra
April 15, 2025 4:26 PM IST
30 रूपये भाव अन् खर्च 100, दूध विक्रीमधून गायीचा खर्चही निघेना, शेतकऱ्यानं थेट हिशोब मांडला, Video