Last Updated:
काजूच्या बोंड्यांपासून सोडा बनवण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. या संकल्पनेमुळे केवळ पर्यावरणपूरक नाही, तर शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधनही ठरते आहे.
पुणे : सध्याच्या घडीला पारंपारिक पीक पद्धतीमुळे अनेकदा शेती व्यवसाय हा तोट्यात गेल्याचे पाहिला मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत शेतकरी नवीन प्रयोग करतांना पाहिला मिळत आहेत. पारंपरिक उत्पादन पद्धतीला फाटा देत कोकणातील शेतकरी प्रमोद वळंज यांनी कोकण परिसरात शेतकऱ्यांकडून फेकून दिल्या जाणाऱ्या बोन्ड्यांपासून सोडा आणि सिरप तयार करण्यास सुरुवात केली आहे. काजूच्या बोंड्यांपासून सोडा बनवण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. या संकल्पनेमुळे केवळ पर्यावरणपूरक नाही, तर शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधनही ठरते आहे.
बोन्ड्यांपासून विविध उत्पादनांची निर्मिती
कोकणातील शेतकरी आणि निवृत्त अधिकारी प्रमोद वळंज यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. समृद्धी योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या अनुदानामुळे कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. वळंज यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत काजूच्या बोंड्यांपासून विविध उत्पादनांची निर्मिती सुरू केली.
कशी होते प्रकिया?
या प्रक्रियेत, सर्वप्रथम झाडावर तयार झालेला काजू बोन्डा वेचून स्वच्छ धुतला जातो आणि निर्जंतुकीकरणासाठी 15 ते 20 मिनिटे उकळवला जातो. त्यानंतर बोंड्यांचा रस काढण्यासाठी क्रशिंग मशीनचा वापर केला जातो. या रसाचा वापर करून नैसर्गिक काजू सिरप आणि सोडा तयार केला जातो.
पर्यावरणाला सकारात्मक फायदा
या उपक्रमामुळे पूर्वी फेकून दिले जाणारे काजू बोंड्या आता शाश्वत उत्पादनात परिवर्तित झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असून पर्यावरणालाही सकारात्मक फायदा होतो आहे. काजू उद्योगातील ही नवी दिशा भविष्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते.
Pune,Maharashtra
Agriculture : कोकणातील शेतकऱ्याची कमाल! फेकून दिल्या जाणाऱ्या काजू बोंड्यांचा असाही वापर, बनवला सोडा, Video