Last Updated:
Agriculture News : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर दिली जाणारी 1.9 टक्के सवलत एक जूनपासून पूर्णपणे रद्द केल्याने शेतकरी, व्यापारी आणि कांदा उत्पादक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर दिली जाणारी 1.9 टक्के सवलत एक जूनपासून पूर्णपणे रद्द केल्याने शेतकरी, व्यापारी आणि कांदा उत्पादक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही सवलत रद्द करण्याचा निर्णय अनपेक्षित आणि अन्यायकारक असल्याचे सांगत अनेकांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असतानाच, आता निर्यात सवलत रद्द केल्यामुळे परदेशी बाजारात भारतीय कांद्याची स्पर्धा कमी होणार आहे.
मागणी होती सवलत वाढवण्याची
व्यापारी आणि शेतकऱ्यांचा यावर ठाम दावा आहे की, सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या किमती अत्यंत स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकवण्यासाठी सवलत वाढवून किमान 10 टक्के करणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारने याचा विचार करण्याऐवजी आधीचीच 1.9 टक्के सवलत पूर्णपणे रद्द केली, हे अत्यंत निराशाजनक असल्याचे मत उत्पादक संघटनांनी मांडले.
निर्यातीवर प्रतिकूल परिणाम
या सवलतीमुळे भारतीय कांद्याला थोडीशी स्पर्धात्मक धार मिळत होती. मात्र ती रद्द झाल्यामुळे निर्यात कमी होईल आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारातही मागणी-पुरवठा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 1:16 PM IST
कांदा प्रश्न पुन्हा पेटणार! कांदा निर्यात सवलत रद्द,शेतकऱ्यांनी केली हि प्रमुख मागणी