मालकी हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर नोंदणी का गरजेची आहे?
मालमत्ताधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची मालमत्ता आपोआपच वारसाच्या नावावर येत नाही. त्यासाठी ‘दाखल-खारीज’ प्रक्रिया आणि अधिकृत नोंदणी आवश्यक असते. मात्र, याबाबत बऱ्याच नागरिकांना संपूर्ण माहिती नसते, त्यामुळे नंतर वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.
वडिलोपार्जित मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते?
फक्त नोंदणी करून मालमत्ता तुमच्या नावावर येत नाही.सर्व कायदेशीर वारसांचा सहभाग, त्यांची संख्या आणि सहमती आवश्यक असते. संबंधित दस्तावेजांची सादर करणं, शपथपत्र तयार करणं, आणि दाखल-खारीज प्रक्रियेची पूर्तता करणं गरजेचं असतं.
तुमच्या नावावर मालमत्ता नोंदवण्यासाठी काय करायचं?
1) मृत्युपत्र (Will) असल्यास
जर मूळ मालकाने वैध इच्छापत्र तयार केलं असेल, तर त्यानुसार मालमत्तेचं हस्तांतरण तुलनेत अधिक सुलभ होतं. मात्र, इच्छापत्रात जर वादग्रस्त बाबी असतील, तर अन्य वारसांकडून न्यायालयीन आव्हान संभवतो.
2)मृत्युपत्र नसल्यास
अशावेळी सर्व कायदेशीर वारसांनी परस्पर सहमतीने मालमत्तेची वाटणी करणे सर्वाधिक योग्य पर्याय ठरतो. ही वाटणी ‘कुटुंब समझोता’ म्हणून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदवणे आवश्यक असते. सर्व मालमत्ता कागदपत्रे, वारसाहक्काचे पुरावे, ओळखपत्रे इत्यादी सादर करावी लागतात.
ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि शपथपत्र का आवश्यक?
जर मृत्युपत्र नसेल, तर शपथपत्र तयार करून सर्व वारसांकडून NOC (No Objection Certificate) घेणे गरजेचे आहे. एखाद्या वारसाला मालमत्तेऐवजी रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली असेल, तर त्याचा उल्लेख दस्तऐवजात स्पष्टपणे करणे अनिवार्य आहे.
Mumbai,Maharashtra
May 03, 2025 10:35 AM IST
वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क मिळवायचा आहे पण मृत्यूपत्र नाही! दावा कसा करायचा? वाचा सविस्तर