By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Monsoon 2025 : मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा…
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Monsoon 2025 : मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा…
टॉप स्टोरीज़

Monsoon 2025 : मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा…

News Desk
Last updated: 2025/06/01 at 9:40 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
तापमानात वाढ, शेतकऱ्यांना इशारामुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची हलकी हजेरीया महत्त्वाच्या गोष्टींकडे असू द्या लक्ष…

महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सध्या ठप्प झाला असून, आगामी काही दिवसांत पावसाची फारशी शक्यता नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किमान 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबलेला राहणार आहे. परिणामी, या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहील, तर काही भागांमध्ये केवळ हलक्या सरींची शक्यता आहे.

तापमानात वाढ, शेतकऱ्यांना इशारा

मान्सून रखडल्यामुळे राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि खानदेशातही तापमान 35 ते 40 अंश दरम्यान राहणार आहे. या कोरड्या हवामानाचा शेतीच्या सुरुवातीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असली तरी हवामान स्थिती पाहता, कृषी विभागाने पेरणी व लागवडीस थोडा विलंब करण्याचा सल्ला दिला आहे. खोट्या किंवा अप्रामाणिक हवामान अंदाजांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची हलकी हजेरी

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

1 जून रोजी या भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, तर 2 ते 4 जून दरम्यान, पावसाचा जोर थोडा वाढून मध्यम स्वरूपाचा राहू शकतो.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, 2 ते 4 जूनदरम्यान या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या गोष्टींकडे असू द्या लक्ष…

राज्यभरात मान्सूनची गती सध्या मंदावली आहे. 10 जूनपर्यंत फारसा पाऊस होण्याची शक्यता नाही. तापमान वाढल्याने उष्णतेची लाट जाणवू शकते. शेतकऱ्यांनी पेरणीस घाई न करता, हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजानुसारच निर्णय घ्यावा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 01, 2025 2:45 PM IST

TAGGED: agriculture, farmers, Maharashtra Monsoon, Monsoon, monsoon 2025, weather news, Weather updates, कृषी, मान्सून, मान्सून २०२५, मान्सून 2025 अपडेट, शेतकरी
Previous Article Agriculture News : पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा
Next Article झेप्टोचा मोठा धक्का, घाण आणि बुरशी… धारावी फूड सेंटर बंद; एफडीएने परवाना रद्द केला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?