योजनेचा उद्देश आणि रचना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे आहे, ज्यायोगे ते शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या लहान-मोठ्या गरजा पूर्ण करू शकतील. सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते, जी तीन समान हप्त्यांमध्ये (दर चार महिन्यांनी) थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात राबवली जाते.
पात्रता निकष कोणते?
या योजनेसाठी खालील पात्रता निकष आहेत जसे की,
शेतजमीन मालक: ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे, तेच या योजनेसाठी पात्र आहेत.
संस्थात्मक मालकी: जर जमीन ट्रस्ट किंवा संस्थेच्या नावावर असेल, तर लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचारी: केंद्र आणि राज्य सरकारचे नोकरदार अपात्र आहेत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळ देण्यात आली आहे.
व्यावसायिक: नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट इत्यादी या योजनेसाठी अपात्र आहेत.
करदाते: मागील आर्थिक वर्षात आयकर भरलेले शेतकरी योजनेच्या लाभातून वगळले गेले आहेत.
हप्त्याची स्थिती कशी तपासाल?
शेतकऱ्यांनी त्यांचा हप्त्याचा स्टेटस तपासण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी. यासाठी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत ठेवली नाही, तर पेमेंटमध्ये विलंब होऊ शकतो.
दरम्यान, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर जून 2025 मध्ये येणाऱ्या 20व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला निश्चित मिळू शकतो. त्यामुळे खात्याशी संबंधित माहिती वेळेत तपासणे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra