By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Monsoon 2025 : शेतकऱ्यांनो सावधान! 40 किमी वेगाने वादळी वारे,अतिमुसळधार पाऊस,’या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Monsoon 2025 : शेतकऱ्यांनो सावधान! 40 किमी वेगाने वादळी वारे,अतिमुसळधार पाऊस,’या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
टॉप स्टोरीज़

Monsoon 2025 : शेतकऱ्यांनो सावधान! 40 किमी वेगाने वादळी वारे,अतिमुसळधार पाऊस,’या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका

News Desk
Last updated: 2025/06/08 at 7:07 AM
News Desk
Share
2 Min Read

मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात काहीशी शांतता पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामान सक्रिय झाले असून राज्यभरात पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण विभागात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई आणि ठाणे भागातही ढगाळ हवामानासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वारे आणि विजांचा कडकडाट

पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागातील नागरिकांनी उघड्यावर राहणे, जलाशयाजवळ जाणे किंवा विजा चमकत असताना झाडांखाली थांबणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

मराठवाड्यात सर्वत्र यलो अलर्ट

धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही पावसाचं वातावरण सक्रिय असून, शेतकऱ्यांनी आगामी शेती कामांसाठी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करावं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

विदर्भातही पावसाचा जोर

बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागातही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

12 जूननंतर पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 12 जूननंतर राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. मान्सून सध्या उत्तरेकडे सरकत असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

हवामान बदल लक्षात घेता पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू ठेवावी. पुढील हवामानाच्या अंदाजावर आधारित शेतीचे नियोजन करावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने विजेपासून दूर राहावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 08, 2025 12:19 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

सावधान! 40 किमी वेगाने वादळी वारे,अतिमुसळधार पाऊस,’या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका

TAGGED: agriculture, agriculture news, monsoon 2025, monsoon update, कृषी, कृषी ताज्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : खरीप हंगाम पीक स्पर्धा 2024चे निकाल जाहीर! कोणत्या शेतकऱ्यांनी मारली बाजी? वाचा यादी
Next Article Agriculture News : फक्त पैसे मोजायचे! एकरात 80 झाडी लावा, 400 रु किलो भाव, वर्षाला कराल लाखोंची कमाई
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?