Last Updated:
Agriculture News : सततच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील भाजीपाल्याच्या किमतींवर झाला आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता रोजच्या जेवणातील भाज्यांसाठीही खिशाला कात्री लावावी लागत आहे.
मुंबई : RBI ने नुकताच EMI कमी करत नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे महागाई कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सततच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील भाजीपाल्याच्या किमतींवर झाला आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता रोजच्या जेवणातील भाज्यांसाठीही खिशाला कात्री लावावी लागत आहे. अनेक भाजीपाला बाजारांमध्ये सध्या केवळ 50 ते 60 टक्केच आवक होत असल्याने दर गगनाला भिडले आहेत.
पावसाचा थेट परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरला. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला पिके पाण्यात गेली. शेतांमध्ये उभ्या पिकांचे नुकसान झाले असून, काही भागांत वाहतूक अडथळ्यामुळे शेतमाल बाजारात पोहोचू शकलेला नाही. यामुळे बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या केवळ 60 टक्क्यांपर्यंतच माल बाजारात येतो आहे, ज्याचा परिणाम थेट किमतींवर झाला आहे.
बाजारातील भाजीपाल्याचे दर
सध्या बाजारात सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर वाढले आहेत. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या मुख्य भाज्यांच्या सध्याच्या दरांवर नजर टाकली असता
मटार (वाटाणा) : 140 रु किलो
फ्लॉवर (फूलकोबी) : 40 रु किलो
शिमला मिरची : 80 रु किलो
कारली : 80 रु किलो
कोबी (पत्तागोबी) : 40 रु किलो
ग्राहक त्रस्त, खर्चात झपाट्याने वाढ
भाजीपाल्याचे दर वाढल्याने ग्राहक नाराज आहेत. “भाज्या विकत घ्याव्याच लागतात, पण एवढ्या महागात रोज खरेदी करणं परवडत नाही.” अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 10:38 AM IST
EMI कमी झाला पण जगणं मुश्कील,भाजी-पाल्याचे दर शंभरी पार,वाचा सध्याचे भाव काय?