1) कृषी उत्पादन आणि जीवनावश्यक वस्तू
भारताचे पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर आणि हरियाणा ही सीमावर्ती राज्ये महत्त्वाची अन्नधान्य उत्पादक राज्ये आहेत. युद्धजन्य स्थितीमुळे या भागांतील शेती, पाणीपुरवठा, बियाणे वितरण, ट्रॅक्टरसारखी शेती यंत्रणा आणि शेतमजूरांची उपलब्धता यांवर परिणाम होतो. परिणामी गहू, तांदूळ, डाळी, साखर यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
2)भाजीपाला आणि फळांचा पुरवठा
युद्धामुळे महामार्ग व रेल्वे वाहतुकीत अडथळा येतो. त्यामुळे भाज्या, फळे, कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा वेळेवर पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी महानगरांमध्ये यांची टंचाई निर्माण होऊन भाव दुपटीने वाढू शकतात. यामुळे शहरी भागातील उपभोक्त्यांवर ताण येतो.
3) खते आणि बियाण्यांचा तुटवडा
कृषी उत्पादनासाठी आवश्यक असलेली यंत्रे, खते, औषधे आणि बियाणे ही बऱ्याच प्रमाणात बाहेरून (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) येतात. युद्धामुळे या वस्तूंच्या उत्पादन, वाहतूक आणि वितरण साखळीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे किंवा खत उपलब्ध न झाल्यास शेतीचे नुकसान होते आणि पुढील हंगामात उत्पादनात घट होऊन महागाई वाढते.
4) इंधन महागाईचा थेट परिणाम कृषीवर
शेतकऱ्यांना सिंचनासाठी, वाहतुकीसाठी, यंत्रसामग्री चालवण्यासाठी डिझेलची गरज असते. युद्धामुळे इंधन महाग झाल्यास कृषी उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. परिणामी उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा घटतो, आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो.
5) कृषी अर्थव्यवस्थेवरील परिणाम
युद्धामुळे ग्रामीण भागात रोजगार, बाजारपेठ, आणि शेतीवर आधारित छोट्या उद्योगांवरही परिणाम होतो. परिणामी शेतकरी कुटुंबाच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. शासनाकडून युद्धासाठी मोठा निधी खर्च केला जात असल्याने कृषी अनुदान, विमा योजना, किंवा सेंद्रिय शेतीसाठी मिळणारा पाठिंबा तात्पुरता थांबू शकतो.
दरम्यान, भारत-पाक युद्ध झाल्यास त्याचे तीव्र परिणाम केवळ सीमेपुरते मर्यादित राहत नाहीत. कृषी उत्पादन, अन्न पुरवठा, इंधन, भाजीपाला, औषधे, आणि घरगुती वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महाग होतात. विशेषतः कृषी क्षेत्र हा आर्थिक आघाड्यांवर सर्वात मोठा बळी ठरतो.
Mumbai,Maharashtra
IND VS PAK : भारत-पाक युद्ध झाल्यास कोणत्या वस्तू महाग होतील? कृषी व आर्थिक परिणामांचे विश्लेषण