वीज कोसळण्याचा धोका कोणत्या वेळी वाढतो?
ढगाळ हवामान, गडगडाट, अंधुक आकाश आणि आकाशात विजा चमकल्यास वीज कोसळण्याची शक्यता अधिक असते. पावसाच्या आधी किंवा दरम्यान आकाशात वीज चमकू लागल्यास ती लवकरच जमिनीवर सुद्धा कोसळू शकते. ढगांचा गडगडाट 30 सेकंदांच्या आतच विजेचा चमक दिसल्यास, ती अत्यंत जवळ आली आहे असे समजावे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
शेतीच्या कामातून त्वरित विश्रांती घ्या.वीज चमकण्यास सुरुवात होताच शेतामधून, उघड्यावरून किंवा पाण्याच्या स्रोताजवळून त्वरित दूर जा. खुल्या शेतात राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
झाडांखाली किंवा विद्युत खांबाजवळ थांबू नका
वीज थेट झाडांवर, लोखंडी वस्तूंवर किंवा वीजवाहक तारेजवळ कोसळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोठ्या झाडांच्या किंवा वीज खांबांच्या खाली आश्रय घेऊ नये.
लोखंडी अवजारांपासून लांब रहा
ट्रॅक्टर, नांगर, फावडे, पाईप इत्यादी धातूच्या वस्तू वीज खेचण्याचे माध्यम ठरतात. वादळी हवामानात अशा वस्तू हाताळू नयेत.
शेतीसाठी वापरले जाणारे पंप किंवा उपकरणे बंद ठेवा
वीज पुरवठा अचानक सुरू किंवा बंद झाल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
विजेपासून सुरक्षित अंतर ठेवा
जर वीज कोसळल्याचे दिसले किंवा त्याचा आवाज झाला तर कमीतकमी 30 मीटर अंतरावर राहावे.
घरात सुरक्षित राहा
विजेचा धोका टळेपर्यंत घरात राहणे सर्वात सुरक्षित आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत व प्लग काढून टाकावेत.
मोबाईल वापर टाळा
वादळी व विजेच्या काळात मोबाईलचा वापर शक्यतो टाळावा. विशेषतः उघड्यावर असताना मोबाईल वापरणे धोकादायक ठरू शकते.
दरम्यान, विजेचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूकता आणि तत्परता ठेवणे आवश्यक आहे. जरी पावसाळा शेतीसाठी वरदान असला तरी त्याच्यातील विजांचा धोका जीवघेणा ठरू शकतो. म्हणून काळजी घेऊन सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनच शेतीच्या कामांना गती द्यावी. कोणतीही जोखीम टाळणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.
Mumbai,Maharashtra
May 14, 2025 12:49 PM IST