Last Updated:
Agriculture News : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अशातच भारत – पाक युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अशातच भारत – पाक युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा फटका थेट कृषी क्षेत्र, औद्योगिक उत्पादन, आर्थिक बाजारपेठा आणि जागतिक व्यापार व्यवस्था यांच्यावर मोठ्या प्रमाणावर बसू शकतो.
कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम
भारताचे कृषी उत्पादन मुख्यतः पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांवर आधारित आहे. या राज्यांपैकी बरेच भाग भारत-पाकिस्तान सीमेलगत असल्यामुळे युद्धाच्या वेळी तेथे सैन्य हालचाली, गोळीबार, माइन बॉम्बसारख्या धोरणांमुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. जसे,की शेतकऱ्यांना शेतात जाणे अशक्य होईल. पिकांची कापणी, सिंचन आणि उत्पादन प्रक्रिया थांबेल. शेतमाल वाहतुकीस अडथळे येतील.
युद्ध जर जास्त काळ चालले तर देशांतर्गत अन्नधान्याचा तुटवडा होण्याची शक्यता वाढेल आणि त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात.
आर्थिक व औद्योगिक परिणाम
युद्धजन्य परिस्थितीत देशाचे बहुतेक संसाधन संरक्षण खर्चाकडे वळते. त्यामुळे विकास योजना, पायाभूत सुविधा, कृषी अनुदाने यावर खर्च कमी केला जातो. लघु व मध्यम उद्योग ठप्प होतात आणि बेरोजगारी वाढते. आयात-निर्यातीवर निर्बंध येऊ शकतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होईल. युद्धकालीन आर्थिक अस्थिरता ही परकीय गुंतवणूकदारांना भारतातून बाहेर काढू शकते, ज्यामुळे शेअर बाजार कोसळू शकतो.
जागतिक व्यापारावर घातक परिणाम
भारत हा आशिया खंडातील महत्त्वाचा देश आहेत. भारत जगातील प्रमुख तांदूळ, मसाले, औषधे, सॉफ्टवेअर सेवा पुरवठादार देश आहे. युद्धाच्या काळात या वस्तूंच्या निर्यातीत अडथळे येऊ शकतात, ज्याचा थेट फटका जगभरातील बाजारांना बसेल.
Mumbai,Maharashtra
May 07, 2025 10:46 AM IST
IND VS PAK : कृषी क्षेत्रापासून ते जागतिक व्यापारापर्यंत.. भारत-पाक युद्ध झाल्यास काय परिणाम होणार?