गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत राबवली जाणारी ही योजना आता अधिक व्यापक रूपात ‘उच्च मूल्य पिके समूह’ आणि ‘भाजीपाला समूह’ या दोन नव्या घटकांसह अंमलात आणली जाणार आहे.
आधुनिक शेतीला चालना
या घटकांत बाजारात उच्च दराने विकल्या जाणाऱ्या आणि किमान 100 कोटी वार्षिक उत्पादनमूल्य असलेल्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या घटकात सहभागी होण्यासाठी सलग प्रकल्प क्षेत्र आवश्यक असून, डोंगराळ भागात 50 किमी व मैदानी भागात 80 किमीपर्यंतचा परिसर गृहित धरता येणार आहे.
शेतकरी, एफपीओ, एफपीसी व सहकारी संस्थांना 25% अर्थसहाय्य दिले जाणार आहे, जे त्यांना आधुनिक प्रक्रिया यंत्रणा, साठवणूक केंद्रे आणि विपणन सुलभतेसाठी मदत करेल.
शहरी गरजांनुसार नियोजन
या घटकात देशभरातील शहरी भागांमध्ये मागणी असलेल्या भाजीपाला पिकांचा समावेश आहे – टोमॅटो, बटाटा, कांदा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, सिमला मिरची, आले, लसूण, लिंबू, काकडी इत्यादी.
प्रकल्प सुविधांचे केंद्र शहरापासून 50-100 किमी अंतरावर असावे लागेल. या घटकासाठी एफपीओ आणि एफपीसीसाठी 40% निधी राखीव ठेवण्यात आला आहे, जे त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि सहभाग
या दोन्ही घटकांतील सहभागासाठी अंमलबजावणी संस्था निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यामध्ये एफपीओ, एफपीसी, सहकारी संस्था, खाजगी कंपन्या, भागीदारी संस्था सहभागी होऊ शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 मे 2025
अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ: https://www.nhb.gov.in
माहितीसाठी ईमेल: clusters.nhb@gov.in
योजनेंमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
शाश्वत आणि उच्च गुणवत्तेचे उत्पादन
साखळीप्रणालीद्वारे (value chain) शेतीतून थेट बाजारपेठेपर्यंत सहज पोहोच
प्रक्रिया आणि साठवणूक यंत्रणेचा लाभ
निर्यातक्षम उत्पादनाची क्षमता
केंद्र शासनाकडून थेट अनुदान आणि प्रोत्साहन
आधुनिक शेतीसाठी एफपीओ व एफपीसीचा बळकट सहभाग
Mumbai,Maharashtra
April 30, 2025 11:34 AM IST
केंद्र सरकार टोमॅटो,कांदा आणि बटाट्यासह इतर पिकांच्या शेतीसाठी देणार पैसे, अर्ज कसा आणि कुठे कराल?