By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई
टॉप स्टोरीज़

दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई

News Desk
Last updated: 2025/05/03 at 11:55 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 04, 2025 5:01 AM IST

Success Story : दुष्काळी पट्ट्याचा ठसा असलेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आधुनिक तंत्रज्ञान, गटशेती आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. कोंतेवबोबलाद गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र जगताप-पाटील यांनी एकरी तब्बल 77 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Breaking news

सांगली: दुष्काळी पट्ट्याचा ठसा असलेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आधुनिक तंत्रज्ञान, गटशेती आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. कोंतेवबोबलाद गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र जगताप-पाटील यांनी एकरी तब्बल 77 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांना मिरचीसाठी 42 रुपये प्रति किलो दर मिळाला असून, एकूण 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी कमावला आहे.

पहिल्या प्रयोगात नुकसान, दुसऱ्यांदा यश

चार वर्षांपूर्वी, दत्तात्रय जगताप, रमेश जगताप आणि बाबूराव डुबूल यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ढोबळी मिरचीची लागवड केली होती. मात्र, बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. परंतु यावर्षी त्यांनी पुन्हा आत्मविश्वासाने ढोबळी मिरचीची लागवड केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात विक्रमी यश संपादन केले.

ढोबळी मिरची दिल्ली, जयपूर, कोलकाता बाजारात

या मिरच्यांचे माल जयपूर, दिल्ली, कोलकाता अशा मोठ्या शहरांच्या बाजारपेठांमध्ये थेट पाठवले जात आहे. व्यापारी मिरची खरेदीसाठी शेतावरच पोहोचत असल्याने वाहतूक व विक्री खर्चातही बचत झाली आहे.

गटशेतीचे यशस्वी मॉडेल

गटशेती हा यशाचा किल्ला ठरला. रमेश जगताप, दत्तात्रय जगताप आणि बाबूराव डुबूल या तिघांनी गटशेतीचा प्रयोग करत प्रत्येकी एक एकर क्षेत्रात लागवड केली. एकत्र नियोजन, सल्ला आणि व्यवस्थापन यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली.

जगतापांचा शेतकऱ्यांना सल्ला

“परिस्थिती कितीही कठीण असो, योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर यश निश्चित आहे. आजच्या काळात शेतीत प्रयोग करणे ही गरज आहे.कारण पारंपरिक पद्धतींनी फारसे साध्य होत नाही,” असे दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

दुष्काळावर मात, गटशेतीला सूरवात! सांगलीच्या तीन शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीच्या शेतीतून केली लाखोंची कमाई

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, farmer success story, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त,शेतीत गोमूत्राचा वापर करण्याचे हे फायदे माहितीये का?
Next Article लाल केळाची शेती फायद्याची! एका केळीची किंमत 16 रुपये, एकरात 8 लाखांचं उत्पन्न, कशी कराल शेती?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?