By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : हमीभाव शेतमाल खरेदीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! करोडो शेतकऱ्यांना होणार हा फायदा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : हमीभाव शेतमाल खरेदीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! करोडो शेतकऱ्यांना होणार हा फायदा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : हमीभाव शेतमाल खरेदीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! करोडो शेतकऱ्यांना होणार हा फायदा

News Desk
Last updated: 2025/05/13 at 7:37 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 13, 2025 12:32 PM IST

Agriculture News : कडधान्य आणि तेलबिया पिकांची हमीभावाने खरेदी आता अधिक पारदर्शक आणि शेतकरी-केंद्रित होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, खरीप हंगाम 2025-26 पासून हमीभावाने होणाऱ्या कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी पॉस (POS) मशिनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

News18

मुंबई : कडधान्य आणि तेलबिया पिकांची हमीभावाने खरेदी आता अधिक पारदर्शक आणि शेतकरी-केंद्रित होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, खरीप हंगाम 2025-26 पासून हमीभावाने होणाऱ्या कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी पॉस (POS) मशिनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन देखील बंधनकारक राहणार आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, हमीभाव खरेदी प्रक्रियेत वारंवार गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी येतात. शेवटच्या टप्प्यात खरेदीत अचानक वाढ होणे, अथवा अशेती उत्पादन विक्रीच्या नावाखाली इतर स्रोतांमधून माल आणणे, अशा प्रकारांना थांबवण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच हमीभावाचा लाभ मिळावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

नाफेड व एनसीसीएफची जबाबदारी

सध्या नाफेड, एनसीसीएफ आणि विविध राज्यस्तरीय संस्था कडधान्य व तेलबिया खरेदी करतात. भात आणि गहू खरेदीत सध्या POS मशिनचा वापर केला जात आहे. आता ही यंत्रणा पीएम आशा योजनेअंतर्गत कडधान्य व तेलबियांसाठी लागू होणार आहे.

पीएम आशा योजनेत “किंमत तफावत देय योजना”, “किंमत स्थिरीकरण निधी योजना” आणि “बाजार हस्तक्षेप योजना” अशा तीन योजनांचा समावेश आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे ई-समृद्धी आणि ई-संयुक्ती पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नाफेड आणि एनसीसीएफ यांना त्यांच्या पोर्टल्सना केंद्राच्या युपीएजी पोर्टलशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून खरेदी प्रक्रियेतील सर्व माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होईल.

खरेदी आणि वितरणासाठी निश्चित वेळमर्यादा

कृषी मंत्रालयाने हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी 60 दिवसांची निश्चित मुदत जाहीर केली असून, अतिशय गरजेच्या परिस्थितीत 30 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाऊ शकते. म्हणजेच जास्तीत जास्त 90 दिवसांतच खरेदी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. यानंतर 9 महिन्यांच्या आत खरेदी केलेल्या मालाचे वितरण किंवा विक्री पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्रालयाने दिले आहेत.

नवीन प्रणालीचा उद्देश काय?

या बदलांमुळे खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणं, फसवणुकीला आळा घालणं आणि खरेदी-वितरण प्रक्रियेला शिस्त लावणं हे उद्दिष्ट साध्य होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. डिजिटल साधनांचा वापर आणि बायोमेट्रिक पडताळणी यामुळे शेतीमाल खरेदीत नवा विश्वासार्हतेचा मानक निश्चित होईल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 13, 2025 12:32 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

हमीभाव शेतमाल खरेदीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! करोडो शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, msp, msp news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ब्लूसमार्ट ईव्ही वाहने खरेदी करण्याच्या तयारीत एव्हरेस्ट फ्लीट, सावकारांशी वाटाघाटी – ईव्ही वाहने खरेदी करण्यासाठी एव्हरेस्ट फ्लीट सावकारांसह ब्लूमार्ट्स संभाषण
Next Article Kanda Sathavnuk : कांदा जास्त काळ टिकवायचा आहे का ? मग या टिप्स नक्की लक्षात ठेवा, वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?