कोण पात्र आहे?
ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकरी गट, स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, दुग्ध उत्पादक संघ आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी खुली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते तसेच अंडी, मांस, दूध आणि लोकर व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्यास हातभार लागतो.
आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे:
आधारकार्ड आणि पॅनकार्ड
प्रकल्प अहवाल
मालकी हक्काचा सातबारा उतारा किंवा भाडेकरार पत्र
बँक खाते तपशील
रहिवासी पुरावा
अनुभव आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र
नोंदणीकृत कंपन्यांसाठी जीएसटी नोंदणी, लेखामेळ आणि आयकर विवरणपत्र
अनुदान मिळण्याची प्रक्रिया
या योजनेतून एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान दिले जाते, जे दोन टप्प्यांत वितरित होते:
पहिला टप्पा: केंद्र शासनाकडून प्रकल्प मंजुरी मिळाल्यानंतर आणि जिल्हा स्तरावरील तपासणीनंतर दिला जातो.
दुसरा टप्पा: प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिम अनुदान दिले जाते.
अनुदानाची मर्यादा
शेळी-मेंढी पालन: 10 ते 40 लाख रुपये
कुक्कुट पालन: 25 लाख रुपये
वराह पालन: 15 ते 30 लाख रुपये
पशुखाद्य आणि वैरण निर्मिती: 50 लाख रुपये
कोण अर्ज करू शकतो?
स्वतंत्र शेतकरी
शेतकरी उत्पादक संस्था (FPO)
बचत गट (SHG)
शेतकरी सहकारी संस्था (FCO)
संयुक्त दायित्व गट (JLG)
अर्ज करण्याची प्रक्रिया
ज्या तरुणांकडे किमान 3 ते 5 एकर शेती आहे, त्यांना केवळ 10% गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करता येईल. इच्छुक अर्जदारांनी www.nim.udyamimitra.in किंवा dahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
Mumbai,Maharashtra
तरुणांसाठी सुवर्णसंधी! शेतीपूरक व्यवसायांसाठी सरकार देतय 50 लाख रु, अर्ज कसा आणि कुठे कराल?