पावसाळ्यात लावता येणाऱ्या मुख्य भाज्या
मेथी
मेथी ही पावसाळ्यातील अतिशय उपयुक्त भाजी आहे. यासाठी फारशी देखभाल लागून राहत नाही. घरच्या कुंडीत 6 ते 8 इंच माती भरून थेट बी टाकावी लागते. सुमारे 30 दिवसांत भाजी तयार होते.
पालक
पालक ही जलद वाढणारी आणि पौष्टिक भाजी आहे. या हंगामात तिची वाढ उत्तम होते. पालक पाण्याच्या कमतरतेमुळे लवकर कोमेजतो, म्हणून पावसाळा त्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे.
भेंडी
भेंडी ही उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात सहज उगवते. तिच्या बियांना थोडेसे भिजवून लावल्यास अंकुरण चांगले होते. दोन महिन्यांत उत्पादन मिळू शकते.
दुधी भोपळा, तोंडली, घोसाळे
हे सर्व वेलवर्गीय भाजीपाला आहेत. पावसाळ्यात त्यांची लागवड अत्यंत फायदेशीर ठरते. वेल वाढवण्यासाठी कुंडीला काठी किंवा जाळीची गरज असते.
कोथिंबीर
कोथिंबीरही थोड्याशा जागेत सहज उगवू शकते. यासाठी भरपूर प्रकाश आणि योग्य निचरा होणारी माती गरजेची आहे.
मिरची
मिरचीच्या रोपांना ओलसर हवामान आवडते. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली, तर संपूर्ण हंगामभर उत्पादन मिळू शकते.
होम गार्डनसाठी काही टिप्स
मातीचे मिश्रण – भाजीपाल्यासाठी 50% बागेची माती, 30% सेंद्रिय खत (कंपोस्ट), 20% वाळू यांचे मिश्रण वापरा.
पाण्याचा निचरा – पावसाळ्यात अतिरिक्त पाण्यामुळे मुळे कुजतात.त्यामुळे कुंड्यांना निचऱ्याच्या भोकांची व्यवस्था आवश्यक आहे.
किडींचा प्रादुर्भाव – पावसात बुरशी, फुलकिडे, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव होतो.यासाठी निंबोळी अर्क किंवा घरगुती जैविक कीटकनाशकांचा वापर करा.
प्रकाश – वेली व फुलफळ भाज्यांना अधिक प्रकाशाची गरज असते.अशा झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
Mumbai,Maharashtra
Agriculture News : पावसाळ्यात होम गार्डनमध्ये कोणत्या भाज्यांची लागवड करावी? वाचा सविस्तर