शेतकरी, वितरक आणि विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर भेडसावणाऱ्या अडचणींचे वेळीच निवारण करण्यासाठी कृषी विभागाच्या आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध सेवा
WhatsApp क्रमांक: 9822446655
टोल फ्री क्रमांक: 1800 233 4000
ई-मेल आयडी: controlroom.qc.maharashtra@gmail.com
तक्रारी नोंदवताना काय द्यावे?
शेतकरी किंवा तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसह खालील तपशील नमूद करावेत जसे की,
नाव, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक तक्रारीचा संक्षिप्त तपशील
संबंधित निविष्ठेची माहिती (उदा. बियाण्याचा प्रकार, कंपनी, विक्रेता, साठेबाजी, किंमत, गुणवत्ता इ.)
तक्रार कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो घेऊन WhatsApp किंवा ई-मेलवर पाठवला तरी तो ग्राह्य धरला जाईल. ज्यांना WhatsApp वापरणे शक्य नाही, त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तोंडी तक्रार नोंदवावी.
तक्रार नोंदणी वेळ
सकाळी 6 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामात आवश्यक निविष्ठा योग्य दरात आणि वेळेत मिळाव्यात, त्यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. नियंत्रण कक्षाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक वेगाने सोडवता येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Mumbai,Maharashtra
May 24, 2025 12:28 PM IST
शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?